Ticker

10/recent/ticker-posts

केंद्रप्रमुख टेस्ट सिरीज|Student Benefit Schemes | विद्यार्थी लाभाच्या योजना

 केंद्रप्रमुख भरती विभागीय स्पर्धा परीक्षा | Kendrapramukh exam | Test Series |

Student Benefit Schemes | विद्यार्थी लाभाच्या योजना


टेस्ट सिरीज 

आजचा घटक 







आपणास मिळालेल्या रोल नंबर द्वारे निकाल पहा.


 



Kendra Pramukh Test Series विद्यार्थी लाभाच्या योजना 

महाराष्ट्र शासनाने खडू फळा मोहीम कोणत्या वर्षी राबवली?

  1. 1990-91

  2. 1995-96

  3. 1988 -89

  4. 1980-81

Correct answer

1988 -89

 

DPEP म्हणजे काय?

  1. District primary education programme

  2. District primary economic programme

  3. District private education programme

  4. None of these

 

Correct answer

District primary education programme

 

A)केंद्र सरकारने 1994 मध्ये जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम राबवण्यास सुरुवात केली.

B) जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रमात केंद्र व राज्य यांच्या खर्चाचे प्रमाण 85: 15 असे होते.

  1. दोन्ही विधाने चूक आहेत.

  2. दोन्ही विधाने बरोबर आहेत.

  3. फक्त विधान A बरोबर आहे.

  4. फक्त विधान B बरोबर आहे.

 

Correct answer

दोन्ही विधाने बरोबर आहेत.

 

प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण करण्यासाठी सर्व शिक्षा अभियान कधी सुरू केले?

  1. 2000

  2. 2001

  3. 2005

  4. 2010

 

Correct answer

2001

 

राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान संदर्भात चुकीचे विधान निवडा.

  1. हे अभियान केंद्र शासनाने 2009 -10 मध्ये सुरू केले

  2. केंद्र व राज्य यांच्या खर्चाचे प्रमाण 50: 50 असे आहे.

  3. हे अभियान प्राथमिक शाळेसाठी आहे.

  4. माध्यमिक शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ करणे हे ध्येय आहे.

 

Correct answer

हे अभियान प्राथमिक शाळेसाठी आहे.

 

राष्ट्रीय साक्षरता अभियान संदर्भात चुकीचे विधान निवडा.


  1. केंद्र शासनाने 1970 यावर्षी राष्ट्रीय प्रौढ शिक्षण मंडळाची स्थापना केली.

  2. या योजनेची व्याप्ती वाढवून केंद्र शासनाने 1988 यावर्षी राष्ट्रीय साक्षरता अभियानाची सुरुवात केली.

  3. राज्यातील 15 ते 35 वर्ष या वयोगटातील निरक्षर स्री पुरुषांना निश्चित कालावधीत कार्यात्मक साक्षर करणे हे ध्येय आहे.

  4. संपूर्ण साक्षरता अभियान सर्वात प्रथम महाराष्ट्रात राबवले गेले

Correct answer

संपूर्ण साक्षरता अभियान सर्वात प्रथम महाराष्ट्रात राबवले गेले

 

संपूर्ण साक्षरता अभियान सर्वात प्रथम कोणत्या राज्यात राबवले गेले?

  1. महाराष्ट्र

  2. केरळ

  3. गुजरात

  4. कर्नाटक

 

Correct answer

केरळ

 

राष्ट्रीय साक्षरता अभियानात राहिलेल्या उणिवा दूर करण्यासाठी व महिलांची साक्षरता वाढवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने कोणत्या योजनेत साक्षर भारत अभियान राबवण्याचे ठरवले.

  1. बाराव्या पंचवार्षिक योजनेत

  2. नवव्या पंचवार्षिक योजनेत

  3. अकराव्या पंचवार्षिक योजनेत

  4. दहाव्या पंचवार्षिक योजनेत

Correct answer

अकराव्या पंचवार्षिक योजनेत

 

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजना यासंदर्भात चुकीचे विधान निवडा.

  1. ही योजना महाराष्ट्र सरकारने 20 ऑगस्ट 2003 सालापासून सुरू केली.

  2. 25 ऑगस्ट 2010 पासून या योजनेचे नामकरण राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना असे झाले

  3. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास 2 लाख रु. त्याच्या पालकांना नुकसान भरपाई मिळते

  4. विद्यार्थ्यास कायमस्वरूपाचे दिव्यांगत्व आल्यास 50 हजार रुपये नुकसान भरपाई मिळते.

 

Correct answer

या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास 2 लाख रु. त्याच्या पालकांना नुकसान भरपाई मिळते

 

राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना यासंदर्भात चुकीचे विधान निवडा.

  1. ही योजना अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे.

  2. ही योजना 2003-04 मध्ये सुरू करण्यात आली.

  3. या योजनेचा लाभ इयत्ता अकरावी व बारावी वर्गात शिकणाऱ्या मुला मुलींना मिळतो.

  4. इयत्ता दहावीत 75 टक्के पेक्षा जास्त गुण असणारे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असतात.

  5. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना दर महा 500 रुपये मिळते.

Correct answer

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना दर महा 500 रुपये मिळते.

 

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी प्रिमॅटिक शिष्यवृत्ती योजना यासंदर्भात चुकीचे विधान निवडा.

  1. ही योजना मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध शीख, पारसी व जैन या विद्यार्थ्यांसाठी आहे

  2. विद्यार्थ्यास 50 टक्के पेक्षा जास्त गुण आवश्यक आहे

  3. पात्र विद्यार्थ्यास प्रति वर्षाला दोन हजार रुपये मिळतात.

  4. पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

  5. एका कुटुंबातील फक्त दोन विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळतो.

Correct answer

पात्र विद्यार्थ्यास प्रति वर्षाला दोन हजार रुपये मिळतात.

 

प्रधानमंत्री फेलोशिप योजनेची घोषणा कोणत्या वर्षीच्या बजेटमध्ये करण्यात आली ?

  1. 2017-18

  2. 2018-19

  3. 2019-20

  4. 2021-22

 

Correct answer

2018-19

 

विद्यांजली योजने संदर्भात चुकीचे विधान निवडा.

  1. या योजनेची सुरुवात मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या वतीने करण्यात आली.

  2. ही योजना सर्व शिक्षा अभियान अंतर्गत लागू करण्यात आली.

  3. या योजनेची सुरुवात 16 जून 2020 रोजी करण्यात आली.

  4. ही योजना प्रधानमंत्री जनधन योजनेचा एक भाग आहे.

 

Correct answer

या योजनेची सुरुवात 16 जून 2020 रोजी करण्यात आली.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना यासंदर्भात चुकीचे विधान निवडा.

  1. या योजनेची सुरुवात 2016- 17 ला झाली.

  2. अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून निवास व भोजन व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यास मिळतात.

  3. या योजनेसाठी विद्यार्थ्यांना दहावी बारावी पदवी पदविका परीक्षेमध्ये 80% पेक्षा जास्त गुण असणे गरजेचे आहे.

  4. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीही मर्यादा 50% असेल

 

Correct answer

या योजनेसाठी विद्यार्थ्यांना दहावी बारावी पदवी पदविका परीक्षेमध्ये 80% पेक्षा जास्त गुण असणे गरजेचे आहे.

 

केंद्र सरकारने स्वच्छ भारत मिशन हा कार्यक्रम कधी जाहीर केला ?

  1. 2 ऑक्टोबर 2010

  2. 2 ऑक्टोबर 2015

  3. 2 ऑक्टोबर 2018

  4. 2 ऑक्टोबर 2014

Correct answer

2 ऑक्टोबर 2014

 


विद्यार्थी लाभाच्या योजना कोणत्या आहेत


 







शैक्षणिक माहिती त्वरित मिळण्यासाठी  खालील लिंकवर स्पर्श करून व्हॉट्स ग्रुपला जॉईन व्हा




Post a Comment

0 Comments

Total Pageviews